Sunday 22 May 2016

ʻअन्नपूर्णाʼ सुरेखा वाळके यांचा ʻचैतन्यʼमयी प्रवास

एखाद्या गृहिणीने मनात आणले तर ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेखा वाळके. आजवरच्या आयुष्यात त्यांनी ब्युटीशियन, नगरसेविका ते एक यशस्वी हॉटेल उद्योजिका, असा प्रवास सहज पार पाडला आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत आवर्जुन उल्लेख करावा लागेल अशा कोकण पट्ट्यातील मालवणी खाद्यसंस्कृतीला सुरेखा वाळके यांच्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. सुरेखा यांच्या हॉटेलमधील स्वादिष्ट्य आणि रुचकर अशा मालवणी जेवणाला खवय्यांची तसेच अनेक कलाकारांची देखील दाद मिळाली. सध्या सुरेखा यांच्या ʻचैतन्यʼ हॉटेलच्या शाखा दादर, ठाणे, सावंतवाडी आणि मालवण या ठिकाणी आहेत. माटुंगा येथे लवकरच त्यांची शाखा सुरू होईल. सुरेखा यांच्या जीवनातील एक गृहिणी ते यशस्वी हॉटेल उद्योजिका, अशा प्रेरणादायी प्रवासाबद्दल आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले.
आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना सुरेखा सांगतात की, ʻ३० वर्षांपुर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मी सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी परकी झाले होते. पतीला वारसाहक्कातून मिळालेले घर आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत २५ हजार रुपये घेऊन सुरू केलेला किराणा मालाचा व्यवसाय, एवढीच पुंजी आमच्याजवळ होती. लग्नानंतर किराणा मालाचा व्यवसाय तर सुरू होता. मात्र अर्थार्जनाची गरज म्हणून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची आस माझ्या मनात निर्माण झाली. माझ्या वडिलांचा बेकरी आणि मिठाईचा व्यवसाय होता. लहानपणी मी माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत होते. त्यामुळे व्यवसायासाठीचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले होते. मला नटण्या मुरडण्याची आवड असल्याने पहिल्यांदा माझ्या मनात ʻब्युटीपार्लरʼचा व्यवसाय करण्याची कल्पना आली. त्यानंतर मी महाराष्ट्र बॅंकेतून

पुढे वाचण्यासाठी

No comments:

Post a Comment