'ज्या स्त्रीला आपण अबला म्हणतो, ती स्त्री ज्या क्षणी सबला होईल, त्याक्षणी
जे कोणी असहाय्य आहेत, ते सर्व शक्तीमान होतील', राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी
उच्चारलेले हे शब्द आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी प्रत्यक्षात उतरवले आहेत.
कायम पुरुषांची मक्तेदारी असलेले एक क्षेत्र म्हणजे आयपीएस अर्थात इंडियन पोलीस
सर्व्हिस. या क्षेत्रात शारीरिक अडचणींसोबतच मानसिक आणि भावनात्मक ताणदेखील
व्यक्तींमधल्या मर्यादांची सतत जाणीव करुन देत असतो. परंतु मीरा बोरवणकर यांनी या
सर्व आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात आपला वेगळा ठसा या क्षेत्रात उमटवला आणि नवा
आदर्श घालून दिला. २०१३ साली 'द ग्लोबल टाईम्स' या वृत्तपत्रात कार्यरत असताना जागतिक
महिला दिनाचे औचित्य साधून मी आणि माझी सहकारी रश्मी पाटकर आम्ही त्यांची घेतलेली
मुलाखत.
No comments:
Post a Comment