लेख लिहिण्यापासुन ते छापुन आणण्यापर्यंत सर्वच काम आम्हा २५ विद्यार्थ्यांना करायची होती (त्यामुळे एकप्रकारे सरांनी दिलेल आव्हानच होत ते) इंद्रधनूच्या कामाला सुरूवात झाली, मुखपृष्ठ-मलपृष्ठ रचनेपासुन ते लेखांची रचना त्यांचा क्रम ठरविण्यात आला. कोण्या एका मैत्रिणीच्या घरी जमुन काम करू लागलो, प्रिंटींग प्रेस मध्ये रात्री ११ वाजेपर्यंत थांबुन काम करू लागलो ( प्रिंटींग प्रेस म्हणजे जवळपास दुसर घर बनली होती ) सर्व लेखांचे ले आऊटच काम संपवुन २९ डिसें. ला इंद्रधनू छपाई साठी देण्यात आले आणि ३१ डिसें ला आमच्या छापील वार्षिकाची प्रत आमच्या हातात आली. फलश्रुतीचा आनंद कसा असतो ते त्या क्षणात कळून चुकले. दहा दिवस आराम न करता इंद्रधनूसाठी चालवलेली खटाटोप सार्थकी झाल्यासारखे वाटले. नंतर इव्हेंटच्या तयारीला सुरूवात झाली. फक्त ५ दिवसांत संपूर्ण इव्हेंटची तयारी करण्यात आली आणि ५ जाने. २०१२ ला इंद्रधनूचा अनावरण सोहळा आम्ही यशस्वीरित्या पार पाडला. कामाचा सर्व थकवा क्षणार्धात नाहीसा झाला, सरांनी दिलेलं आव्हान आम्ही यशस्वीरित्या पेललं होत कदाचित त्यामुळे काहीश्या विजयी मुद्रेने आम्ही एकमेकांकडे पाहिले.
या इंद्रधनूच्या प्रवासात बरेच चांगले वाईट अनुभव आले. नेहमी विखुरलेला असणारा आमचा वर्ग इंद्रधनूच्या निमित्ताने एकत्र आला, सर्वांबरोबर खुप चांगल मैत्रीच नात जमुन आलं, भांडणसुध्दा झाली शेवटी २५ जणांच आमच एक घर आणि घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारचं त्यामुळे तो भाग सोडला तर इंद्रधनूचा प्रवास हा स्वप्नवत होता. उद्या पत्रकारितेच शिक्षण घेऊन जेव्हा आम्ही बाहेर पडू तेव्हा व्यावसायिक पातळीवर आम्ही एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभे राहणार, कदाचित इंद्रधनू हा एकच धागा तेव्हा आम्हाला एकमेकांसोबत बांधुन ठेवेल...........
Awesome!!!
ReplyDeleteGood going guys!
ALL THE BEST FOR YOUR FUTURE!!!
खुप छान रंजीता. इंद्रधनू चा प्रनास थोडक्यात पण अतिशय योग्य रीतीने सर्वांसमोर मांडलेस.खुप छान.
ReplyDelete